tag:blogger.com,1999:blog-7032879525047682189.post5386807654227878768..comments2020-06-14T05:20:14.464-07:00Comments on Vishakha's Creations: मी ब्राम्हण - राहुल गांधी !!Anonymoushttp://www.blogger.com/profile/06338398997105047557noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7032879525047682189.post-71916581863871139222013-06-27T08:20:25.783-07:002013-06-27T08:20:25.783-07:00द्विजाची कैफियत
हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात...द्विजाची कैफियत<br /><br />हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,<br />कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल<br />हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,<br />कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल<br />हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,<br />कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील<br />हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,<br />कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल<br />हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,<br />कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल<br />हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,<br />कारण त्याला नपुंसकता समजले जाईल<br />हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो<br />कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली<br />हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,<br />कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल<br />हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,<br />कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो<br />हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,<br />कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो<br />नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,<br />शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र<br />हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,<br />कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका<br />आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,<br />रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही<br />ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,<br />जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे<br />जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,<br />पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत<br />आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,<br />शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत<br />आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,<br />भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत<br />त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,<br />म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही<br />काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,<br />मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे<br />धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,<br />त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही<br />वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,<br />यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,<br />धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,<br />ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे<br />स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,<br />समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत<br />सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,<br />अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका<br />जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,<br />मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही<br />आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,<br />शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,<br />जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी<br />द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,<br />द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही<br />वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,<br />पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत<br />शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,<br />हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही<br />सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,<br />गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.<br />हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.<br />उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,<br />यश खेचून आणायचे आहे<br />होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,<br />द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे<br /><br />- कवी योगेशKavi Vidyanujhttps://www.blogger.com/profile/08105714673311296472noreply@blogger.com