विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

स्त्री - मुक्ती !!


आरोहातील सप्तसुरात आपले जीवन न्हावून निघाले असते, तारुण्यातील वातावरणात धुंद असताना सूर्याची सप्तकिरणे नकळत आपल्याला आरोहातून अवरोहात म्हणजे माहेरहून अलगद सासरी आणतात. एका मंगलमय वातावरणात, अग्निदेवाच्या साक्षीने, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने रेशमी इंद्रधनुष्य साकारण्याचे बळ घेवून आपण एका नवीन विश्वात प्रवेशतो. माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी आल्यावर  "चूल आणि मुल" एव्हढेच आपले जीवन नसून  एक वेगळ अस्तित्व  असल्याने त्या दिशेने आपली वैचारिक वाटचाल सुरु होते. अन मग आपल्या आवडीच्या आपुलकीच्या क्षेत्रात आपण प्रवेश करावा अशी आपली  इच्छा असते. ज्या स्त्रियांना लग्नाआधी नौकरी असते अशांची तारांबळ उडून जाते. नौकारीमुळे नवं घर नवी माणसे ह्या सर्वांशी जुळवून घ्यायला एकतर वेळही कमी असतो. शिक्षण झाल्या झाल्या ज्यांचे संसार सुरु होतात त्या स्त्रियांनाही काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असतेच. एकच स्त्री भिन्न प्रकारच्या भूमिकातून कौटुंबिक व सामाजिक जीवन संतुलित राखण्याचा प्रयत्न करू शकते हि भावना आज घरोघरी रुजविली गेली असली तरी स्त्रीला  कौटुंबिक उंबरठा ओलांडून  सामाजिक जीवनात प्रवेश करताना दहादा विचार करावा लागतो. पुष्कळ लोकांच असं म्हणनं असतं  कि "पाण्यात पडल्यावर येत पोहता !!" पण आजच्या सुशिक्षित, संस्कारी स्त्रियांना अविचाराने घडलेली कृती कधीच नको असते. स्वकर्तृत्वाने मिळविलेल्या निर्लेप स्वातंत्र्यावर तिचा विश्वास असतो.

मुक्ती म्हणजे नसे स्वैराचार
मुक्ती म्हणजे नसे अविचार
मुक्ती म्हणजे नसे दुराचार
अविचाराने घडलेल्या स्वैराचारात लपतात सारे दुराचार
निर्लेप स्वातंत्र्य असती मुक्ततेत
स्वकर्तृत्वाची लाकिरे असती मुक्ततेत
निर्लोभी नेतृत्व असती मुक्ततेत
निर्लेप नेतृत्वातून मिळेल कर्तृत्ववान मुक्तता
मुक्त होण्या हवी मातृता
मंगळसूत्राची हवी सुसूत्रता
कंकणाची हवी हवी अखंडता
अखंड सुसूत्र मातृत्वाने मिळेल सार्थ स्वतंत्रता

प्रत्येक स्त्रीने अपेक्षिलेली अशी स्वतंत्रता जर तिला मिळाली तर तिच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे तिला वाटते. आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने आपल्या उद्दिष्टाप्रत जाताना आपल्याला अपयश आले तर आपल्या घरची माणसे आपल्याला समजून घेतील?? कोणतेही अपयश कायमचे असत नाहि , अपयश यशाचा विरोध नाहि तर विलंब सुचविते . अपयशाच्या पायऱ्यांनी यशाची शिडी निर्माण होते हे माहित असूनही आपण खचून गेलो तर??? याउलट यशाचं एकेक  दार उघडून समोर जात असताना आपल्या घरचं दार आपल्या पासून खूप दूर झालंय हे खूप उशिरा लक्षात आलं तर ?? स्वत:च्या पायावर उभं राहण्याच्या अभिमानात एकमेकांची अभीरुची जाणून घेण्याचा प्रयत्नच जर आपल्याकडून झाला नाहि तर ?? सर्व प्रश्न निष्क्रीयेप्रत नेणारे !! नको असलेली निष्क्रियता जपणारे !!
तेव्हढ्यात क्रियाशीलता मनाची दर ठोठावते, " निष्क्रिय सत्यच जर क्रियाशील असत्यासमोर टिकत नाहि तर निष्क्रिय स्त्रीचा टिकाव कसा आणि कुठे लागणार ??? लज्जा, स्नेह, प्रेम, दया,माया,ममता हे सर्व गुण स्त्रीच्या ठायी असतातच पण या स्त्रीगुणांसोबत विवेक , कर्तृत्व, पौरुष,निर्भयता या गुणांमधील "पुरुष" जागृत होताच ती धीर गंभीर दृढ सावित्री बनते, तिच्यातून रणचंडी लक्ष्मी प्रकट होते,कर्तृत्ववान अहिल्याबाई प्रकटते, पावित्र्याची मुर्ती सीता अग्निदिव्याला सामोरी जाते.  

3 comments: